

पाऊसकाळ ही लेखकांची पहिलीच कादंबरी. महापुरात पूर्णपणे उदध्वस्त झालेल्या गावाची कहाणी या कादंबरीत येते. घर, शेत, जमीन-जुमला, जनावरे पाण्याखाली गेल्यानंतर दुसर्या गावाच्या आश्रयास गेल्यावरदेखील मूळ प्रवॄत्ती कायम ठेवणारी ताठर स्वभावाची, बेरकी कलागती करणारी माणस पदोपदी कादंबरीत भेटत राहतात. सुरूवातीपासूनच कादंबरीला विलक्षण गती मिळते व एखाद्या सुसाट प्रवाहासारखी ती अखेरपर्यंत न अडखळता वेग घेते. जिथे थांबायला हवी तिथेच संपते. वातावरणात विसंगती येत नाही तशी पात्रांच्या लकबी अनावश्यकही वाटत नाहीत आणि संवादाचा अति सोसही दिसत नाही. वाचता वाचता एखादीच उपमा येते; पण ती आशय उजळवून टाकते. शब्दांचे मोजके नि नेमके उपयोजन आणि आटोपशीर पण बोलके संवाद यांमुळेही पाऊसकाळ कादंबरी एका वेगळ्याच उंचीला जाऊन पोहचते.
Publisher | Mauj Prakashan Gruha |
---|---|
Auther | Vijay Jadhav |
Edition | 1 |
Weight | 0.300000 |
Pages | 172 |
Language | Marathi |
Binding | paperbag |
ISBN No. | 9789350790335 |