1
/
of
2
Akshardhara Book Gallery
सामूहिक वनहक्कप्राप्त क्षेत्रासाठी वन संरक्षण व व्यवस्थापन कार्ययोजना
सामूहिक वनहक्कप्राप्त क्षेत्रासाठी वन संरक्षण व व्यवस्थापन कार्ययोजना
Regular price
Rs.99.00
Regular price
Rs.99.00
Sale price
Rs.99.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Madhav Gadgil
Publisher: Vanarai Prakashan
Pages: 48
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator: ---
सामूहिक वनहक्कप्राप्त क्षेत्रासाठी वन संरक्षण व व्यवस्थापन कार्ययोजना
भारतीय समाजव्यवस्थेच्या उतरंडीत तळाशी मानल्या जाणाऱ्या आणि सर्वार्थाने जंगलांवर अवलंबून असणाऱ्या आदिवासी व इतर वननिवासी समुदायांच्या जीवनात नवसंजीवनी आणणारा हा कायदा आहे. त्यांच्यावरील ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी आणि जंगलांवरील त्यांच्या परंपरागत वन हक्कांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी हा कायदा अंमलात आला. ज्यात सामाजिक न्याय, सत्तेचे विकेंद्रीकरण, लोकसहभागातून वनसंवर्धन आणि एकात्मिक ग्राम विकास यांसारखी उद्दिष्टे साध्य करण्याची क्षमता आहे. वन हक्क कायद्याने आदिवासी व इतर वननिवासी समुदायांची जमीन, उपजीविका आणि अन्नसुरक्षा कायदेशीररित्या सुनिश्चित केली आहे. सदर कायद्यामुळे या वन हक्कधारकांना आणि स्थानिक ग्रामसभेला वन हक्कप्राप्त वनक्षेत्रातील गौण वनउपजावर (इमारती लाकूड सोडून) स्वामित्व अधिकार मिळाले आहेत. यामध्ये त्यांची शाश्वत पद्धतीने काढणी, साठवणूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट इत्यादींचा समावेश होतो. याबरोबरच तिथल्या वनाचे, वन्यजीवांचे, जैवविविधतेचे, पाणलोट क्षेत्राचे, जलस्रोतांचे आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांचे संवर्धन- संरक्षण करण्याची जबाबदारी व अधिकारही त्यांना मिळाले आहेत. इतकेच नव्हे तर नैसर्गिक संसाधनांवर परिणाम करणाऱ्या कोणत्याही विध्वंसक कृती थांबवण्याची, तसेच आदिवासींचा सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा जोपासण्याची जबाबदारी व अधिकारही त्यांना प्राप्त झाले आहेत. वन हक्क कायद्यानुसार प्राप्त झालेल्या या जबाबदाऱ्यांचा व अधिकारांचा सुयोग्य वापर करण्यासाठी ग्राम स्तरावर वन हक्क समिती गठीत करणे आवश्यक आहे. या समितीने आपल्या वनहक्क क्षेत्रातील वनांसाठी वन संरक्षण व व्यवस्थापन योजना अर्थात वन कार्ययोजना बनवणे अपेक्षित आहे. ज्याच्या आधारे ग्रामसभा त्या क्षेत्राचे व्यवस्थापन करू शकेल; परंतु ही कार्ययोजना बनवण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान अशा क्षेत्रातील ग्रामसभेच्या सदस्यांकडे असणे दुरापास्त आहे. म्हणूनच हे ज्ञान या मार्गदर्शिकेच्या स्वरुपात शब्दबद्ध करण्यात आले आहे. प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर सिध्द झालेली आणि अनुभवसंपन्न ज्ञानावर आधारित प्रस्तुत मार्गदर्शिका जमिनीवर 'वन कार्ययोजना तयार करणाऱ्या कार्यकर्त्यांना थेट उपयुक्त पडावी, अशा पद्धतीने लिहिलेली आहे. त्यामुळे ती ग्रामसभांच्या वन संसाधनांशी संबंधित ग्रामविकास आराखड्याचे नियोजन करण्यासाठी उपयुक्त ठरेलच. शिवाय वन हक्क समित्यांच्या सक्षमीकरणालाही हातभार लावेल.
लेखक : माधव गाडगीळ , विजय एदलाबादकर
प्रकाशन : वनराई प्रकाशन
