वडिलधार्यांची लहानांविषयी एक कायमची तक्रार असते. आजकाल मुले काही करीत नाहीत. नुसती धावतात, धडपडतात, अडखळतात, ठेचाळतात, हसतात, खिदळतात आणि उधळतात. त्यांच्या येण्याजाण्याला, धावण्यापळण्याला, उठण्याबसण्याला अर्थ नाही. आपली मुले म्हणजे आपल्यापुढे नियतीने धरलेले आरसे असतात.