श्री अरविंदाची चरित्रकथा हे इहलोकीचे एक नवल आहे. भूतकाळात घडलेले, वर्तमानाच्या सीमेला येऊन भिडलेले व भविष्याबरोबर विस्तार पावणारे श्री अरविंदाचे दिव्य जीवन हा अनेकांच्या उपासनेचा विषय झाला आहे. श्री अरविंद हे एक व्यक्तिमत्व राहिले नाही.