Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Akherache Parv (अखेरचे पर्व)

Akherache Parv (अखेरचे पर्व)

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vijaya Rajadhyaksh

Publisher: Mehta Publishing House

Pages: 178

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

अखेरचे पर्व

पंडित ऐकत होते. ऐकत असताना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा पट त्यांच्या डोळ्यांसमोरून जात होता. त्या आयुष्याने काय दिले? क्षणिक आनंद मिळालाही असेल; पण शारदाच्या मनात आहे तसा स्थिर आनंद, तृप्ती ? शारदा म्हणाली तेच खरं. दोन मार्ग असतात- एक स्वतःला उधळण्याचा आणि दुसरा स्वतःला रुजवण्याचा, राखण्याचा. त्या वेळी तो दुसरा मार्ग दिसलाच नाही; दिसला असता तरी तो स्वीकारला गेला नसता. आज मात्र वाटते की, तो दुसरा मार्गच खरा! अजून रुजता येईल का? ते रुजलेपण केवढे सामर्थ्य देते ! ते सामर्थ्य जवळ होते म्हणूनच शारदा आपल्याला परत बोलावू शकली. आयुष्यातील खंत, हेवेदावे, कटुता यांच्या पलीकडे जाण्याची दिशा दाखवणारे सामर्थ्य आपल्याला कधी मिळेल का ? 'अखेरचे पर्व' हा ख्यातनाम लेखिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला हा कथासंग्रह. विजयाबाई आपल्या आसपास घडणाऱ्या, अगदी साध्या वाटणाऱ्या घटना-प्रसंगांवर तसेच एखादी व्यक्ती किंवा त्यांना भेटलेली, भावलेली वेगळी माणसे (मग ती सामान्य का असेनात!) किंवा कोणताही शब्द (उदा. आभाळ, उद्ध्वस्त, खेळ, संयोग, अश्मा) असो; त्यावर सहज, ओघवत्या शैलीत वाचनीय कथा लिहितात. हे सर्व त्या कोणताही अभिनिवेश न बाळगता सहजपणे एखाद्या व्यक्तीला गोष्ट सांगावी इतक्या हळुवारपणे, प्रत्ययकारी पद्धतीने लिहितात. तरल वच संवेदनशील शैलीमुळे अशा कथा वैशिष्ट्यपूर्ण आणि वाचनीय ठरतात.

लेखक. विजया राजाध्यक्ष 
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details