Akshardhara Book Gallery
Bharatatil Pramukh Dharane (भारतातील प्रमुख धरणे)
Bharatatil Pramukh Dharane (भारतातील प्रमुख धरणे)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sudam Dagadu Dhadge Sir
Publisher: Sudam Dagadu Dhadge Sir
Pages: 96
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
भारतातील प्रमुख धरणे
म. फुले यांचा जन्म १८२७ मध्ये पुणे येथे झाला. त्यावेळी समाज फारच मागासलेला होता. समाज प्रबोधनाचे कार्य फुल्यांनी केले. स्त्री शिक्षण, मागास वर्गीयांना शिक्षण दिले व सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली. शेतकऱ्यांचे प्रश्न व दुःख त्यांनी जवळून पाहिले होते. त्यांनी शेतकऱ्याचा आसूड या त्यांच्या पुस्तकात म्हणतात की शेतकऱ्यांना शेतीचा व्यवसाय त्यांनी जर व्यवस्थितपणे केला तर त्यात त्यांचा फायदा आहे. पण शेतीसाठी भरपूर साधणे बी-बियाणे, आधुनिक खते, सरकारने शेतकऱ्यांना पुरविली पाहिजे. पण आज भारतात पाऊस हा अनियमित स्वरूपाचा आहे. भरपूर पाऊस पडतो पाणी नदीला येते ते वाहून जाते. उन्हाळ्यात शेतीला पाणी पुरत नाही. त्यामुळे शेतकरी दोन पिके घेऊ शकत नाही. त्यासाठी म. फुले म्हणतात सरकारने नद्यावर बांध घालून मोठी धरणे बांधावी नदीचे पाणी कालव्या द्वारे शेतीला पुरवावे म्हणजे शेतकरी शेतीत काम करून भरपूर उत्पन्न वाढवू शकेल. शिवाय शेतकऱ्यांचा गौरव करावा त्यातूनच शेतकऱ्यांना शेतीविषयी आपुलकी वाटेल. हे म. फुले यांचे विचार सरकारला पटले आहेत. आज देशात बऱ्याच नद्याना बांध घालून त्यावर धरणे बांधली आहे, त्याचा वापर विद्युत निर्मिती करून देशातील कारखानदारी वाढीला लागली आहे. आजचा शेतकरी सुखी समृद्ध झाला आहे. त्याला कारण म. फुले यांनी देशाला सरकारला दिलेली प्रेरणा होय असा समाजसुधारक देशात पुन्हा होत नाही. त्यांना माझे शतशः प्रमाण.
लेखक व प्रकाशक. सुदाम दगडू धाडगे सर
